शिवसेना हा सर्वसामान्य कार्यकर्त्याला नेता घडविणारा पक्ष म्हणून ओळखला जातो. या परंपरेला अनुसरून माजी आरोग्यमंत्री तथा वाशी-भूम-परांडा मतदारसंघाचे विद्यमान आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांनीही कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या कार्यकर्त्यांना संधी देऊन त्यांना नेतृत्वाच्या स्थानापर्यंत पोहोचवण्याचे काम केले आहे.

शिवसेनेची स्थापना झाल्यापासूनच हा पक्ष सर्वसामान्यांचा पक्ष म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणात ओळखला जातो. शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या काळातही अनेक सामान्य कार्यकर्त्यांना आमदार-मंत्री होण्याची संधी मिळाली. त्याच परंपरेतून आज महाराष्ट्राच्या राजकारणात केंद्रस्थानी असलेले शिवसेनेचे मुख्य नेते, माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रवासही सर्वसामान्य रिक्षाचालकापासून मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचलेला आहे. हा प्रवास म्हणजे पक्षाने सर्वसामान्य कार्यकर्त्यांना दिलेल्या बळाचे उत्तम उदाहरण आहे.
स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेली हीच शिकवण मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पक्षातील सर्व लोकप्रतिनिधींना देतात. त्याच धर्तीवर आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत हे धाराशिव जिल्ह्यात छोट्यात छोट्या निवडणुकीतही कार्यकर्त्यांना संधी देण्याची परंपरा जपताना दिसतात. एखादा कार्यकर्ता राजकारणात किती मोठा किंवा अनुभवी आहे यापेक्षा तो सर्वसामान्यांच्या कामासाठी निस्वार्थपणे धावतो का, पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करतो का, गरजूंना न्याय मिळवून देण्यासाठी झटतो का—याला ते अधिक महत्त्व देतात.

अशाच पद्धतीने कोणतीही मोठी राजकीय पार्श्वभूमी नसतानाही मला संधी मिळाली, असे शिवसेनेचे नवनियुक्त जिल्हा परिषद सदस्य संदेश उर्फ विकी चव्हाण यांनी सांगितले. “मी साधी ग्रामपंचायत निवडणूकसुद्धा लढवलेली नव्हती. मात्र नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तेरखेडा जिल्हा परिषद गटातून मला उमेदवारी देण्यात आली आणि मी निवडूनही आलो. पुढे धाराशिव जिल्हा परिषदेत सत्तेत बसताना मला शिवसेना गटनेतेपदाची जबाबदारीही देण्यात आली. त्यामुळे एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून आज जिल्ह्याच्या राजकारणात माझी ओळख निर्माण झाली आहे,” असे त्यांनी सांगितले.
“शिवसेना पक्ष, मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास मी कायम सार्थ ठरवेन. गरजवंत व सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्नशील राहीन,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त राजकीय कट्टाशी बोलत होते.पक्षाच्या ध्येय-धोरणांशी निष्ठा राखण्याची प्रतिज्ञाही जिल्हा परिषदेचे शिवसेनेचे गटनेते विकी उर्फ संदेश चव्हाण यांनी केली. “कार्यसम्राट आणि शिवजल क्रांतीचे प्रणेते असलेल्या आमदार सावंत यांसारख्या नेत्याने कार्यकर्त्यांना घडविण्याची जी धमक दाखवली आहे, अशा नेत्यांना आमच्यासारख्या सर्व कार्यकर्त्यांचे देखील आयुष्य लाभो आणि येणाऱ्या काही काळातच डॉ.तानाजीराव सावंत साहेब हे महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात दिसो अशा प्रकारच्या शुभेच्छा त्यांनी यावेळी बोलताना दिल्या….












Users Today : 69
Users Yesterday : 67
This Month : 1039
Total Users : 30724