Monday, September 14, 2026
rajkiyakatta.in
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान
No Result
View All Result
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान
No Result
View All Result
rajkiyakatta.in
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान

संविधानास सूर्य, चंद्र असेपर्यंत कोणीही बदलणार नाही-धनंजय मुंडे

Rajkiy Katta by Rajkiy Katta
5 May 2024
in राजकीय
0
संविधानास सूर्य, चंद्र असेपर्यंत कोणीही बदलणार नाही-धनंजय मुंडे
0
SHARES
17
VIEWS

धाराशिव राजकीय कट्टा –

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्यातील मतदारसंघातील प्रचाराचा आज समारोप होणार आहे. यंदाची लोकसभा निवडणूक देशाच्या प्रतिष्ठेची व भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे. देशाच्या प्रतिष्ठा व भवितव्यासाठी तसेच धाराशिव जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी  महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा असे आवाहन राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे.  

धारशिव लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचारार्थ शनिवारी कळंब शहरातील अहिल्याबाई होळकर चौकात धनंजय मुंडे यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर आमदार राणाजगजितसिंह पाटील, सुरेश पाटील, संजय मुंदडा, नितीन काळे, बंडूभाऊ बनसोडे आदी उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना कृषीमंत्री मुंडे म्हणाले, धाराशिव येथे  पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा झाल्यानंतर मतदारसंघातील राजकीय वातावरण बदलले आहे. तर कळंबच्या या जाहीर सभेने महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांचा विजय निश्चित झाला आहे. दहा वर्षांपूर्वी दिवाळखोरीच्या अवस्थेला नरेंद्र मोदी यांनी दहा वर्षांत जगातील पाचवी अर्थव्यवस्था बनवली आहे. यावरूनच दहा वर्षांत किती विकास झाला हे कळते. दहा वर्षांत एन.डी.ए सरकारने ८० कोटी जनतेला मोफत रेशन दिले, ३७० कलम रद्द केले, शेतकरी सन्मान योजनेतंर्गत प्रत्येक वर्षाला सहा हजार रूपये दिले आहेत. उज्वला गॅस योजनेतंर्गत कोट्यवधी गॅस  कनेक्शन दिले आहेत.

विरोधकांकडे टिका करण्यासाठी मुद्दा नसल्यामुळे बुद्धिभेद करत मोदी संविधान बदलणार अशी टिका करत आहेत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानास सूर्य, चंद्र असेपर्यंत कोणीही बदलणार नाही. आचारसंहिता संपताच अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीबद्दल शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यात येणार असल्याचे सांगितले. आई तुळजाभवानी शक्तीपिठाचे नाव जगाच्या नकाशावर आणण्यासाठी मराठवाडा व धाराशिव जिल्ह्यात २१ टिएमसी पाणी आणण्यासाठी, मोठे उद्योग उभे करण्यासाठी लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन धनंजय मुंडे यांनी केले.

Previous Post

कर्मचारी, अधिकाऱ्यांना शिव्या घालून काम करून घ्यायचं हा त्यांचा धंदा-ॲड.धनंजय धाबेकर

Next Post

शासन दरबारी जनतेचे प्रश्न मांडणारा आणि शासकीय तिजोरीतून निधी आणणारा लोकप्रतिनिधी जनतेला हवा-डॉ.तानाजी सावंत

Related Posts

हा विश्वासघातच नाही का? नगरसेवक संजय मुंदडा व सहकाऱ्यांचा जुन्या पक्षनेतृत्वाला थेट सवाल
राजकीय

हा विश्वासघातच नाही का? नगरसेवक संजय मुंदडा व सहकाऱ्यांचा जुन्या पक्षनेतृत्वाला थेट सवाल

22 August 2026
“मतदारांनी विरोधक निवडले, नगरसेवकांनी सत्ता निवडली!”; कळंबमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या बॅनरने शहरात राजकीय वातावरण तापले
राजकीय

“मतदारांनी विरोधक निवडले, नगरसेवकांनी सत्ता निवडली!”; कळंबमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या बॅनरने शहरात राजकीय वातावरण तापले

21 August 2026
धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा पेच: भाजप-शिवसेनेत काटाजोड; अर्चनाताई पाटील की उषा गायकवाड?
राजकीय

धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा पेच: भाजप-शिवसेनेत काटाजोड; अर्चनाताई पाटील की उषा गायकवाड?

10 March 2026
भूम तालुक्यातील ५ जिल्हा परिषद गटात ७० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात,अंतिम चित्र 27 तारखेला स्पष्ट होणार
राजकीय

भूम तालुक्यातील ५ जिल्हा परिषद गटात ७० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात,अंतिम चित्र 27 तारखेला स्पष्ट होणार

23 January 2026
तेरखेडा जिल्हा परिषद गटातून भाजपकडून प्रवीण घुले इच्छुक
राजकीय

तेरखेडा जिल्हा परिषद गटातून भाजपकडून प्रवीण घुले इच्छुक

9 January 2026
इच्छुकांना नगरपालिका  निवडणुकांनंतर आता वेध जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे
राजकीय

इच्छुकांना नगरपालिका निवडणुकांनंतर आता वेध जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे

27 December 2025
Next Post
शासन दरबारी जनतेचे प्रश्न मांडणारा आणि शासकीय तिजोरीतून निधी आणणारा लोकप्रतिनिधी जनतेला हवा-डॉ.तानाजी सावंत

शासन दरबारी जनतेचे प्रश्न मांडणारा आणि शासकीय तिजोरीतून निधी आणणारा लोकप्रतिनिधी जनतेला हवा-डॉ.तानाजी सावंत

Recent Posts

  • विद्यार्थ्यांनी कोणत्याही परिस्थितीत टोकाचे पाऊल उचलू नये-आ.रोहित पवार
  • शिक्षणमहर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयात धाराशिव जिल्हा युवा महोत्सव
  • लेकीच्या एमबीबीएस प्रवेशाचा आनंद… अवघ्या चार तासांत काळाचा घाला; शिक्षक आप्पासाहेब मुळे यांचे आकस्मिक निधन
  • माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा
  • खा.ओमराजेंनी रात्रीत गेम फिरवला; भाजपच्या वाटेवरील नगरसेवकांचा शिंदे शिवसेनेत प्रवेश!

Recent Comments

No comments to show.

Counter

491310
Users Today : 9
Users Yesterday : 61
This Month : 700
Total Users : 38675
  • Home Page

© 2024 Rajkiya Katta - Design and Developed by DK Techno's.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान

© 2024 Rajkiya Katta - Design and Developed by DK Techno's.

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group