धाराशिव राजकीय कट्टा वृत्तसेवा-
या प्रवेश सोहळ्यात कावळेवाडी येथील जीवन वीर, विनोद उर्फ बबलू कावळे, आण्णा जराड, अभिजीत कावळे, पांडुरंग जराड, रामलिंग कावळे, भैरवनाथ कावळे, आबासाहेब कावळे, परमेश्वर वीर, गोपाळ मुळे, केदारी कावळे, पांडुरंग कोळी, विजय गाडे, अमर कोळी, बंकट जराड आदी युवकांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे )पक्षात प्रवेश घेतला. खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी सर्वांचे पक्षात स्वागत केले. तसेच शिवसेना पक्षाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्याबरोबर आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार शेवटच्या घटकापर्यंत पोहचवून शिवसेना संघटना बळकट करावी, असे आवाहन केले.
याप्रसंगी अच्युत खोत, संग्राम देशमुख, अण्णा तनमोर, काका शिनगारे, गफूर शेख, राकेश सूर्यवंशी, मुजीब काजी, साबेर सय्यद, अक्षय देशमाने, अतिक सय्यद यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.













Users Today : 2
Users Yesterday : 28
This Month : 1134
Total Users : 33978