Friday, July 31, 2026
rajkiyakatta.in
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान
No Result
View All Result
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान
No Result
View All Result
rajkiyakatta.in
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान

गल्ली ते दिल्ली राजकारण करणाऱ्यांसाठी नवा फंडा-लग्नगाठी जुळवा आणि सत्ता मिळवा!

Rajkiy Katta by Rajkiy Katta
14 April 2025
in राजकीय
0
गल्ली ते दिल्ली राजकारण करणाऱ्यांसाठी नवा फंडा-लग्नगाठी जुळवा आणि सत्ता मिळवा!
0
SHARES
128
VIEWS

प्रा.सतिश मातने

राजकारण करायचं असेल तर आता केवळ रस्ते, पाणी, नळ, गटार पुरेसं नाही, तर लोकांच्या लग्नाच्या गाठीही जुळवाव्या लागतील!
पूर्वी नेता व्हायचं म्हणजे समाजात छोटी-मोठी कामं करत करत, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद अशा टप्प्यांतून प्रगती करावी लागायची. मात्र आज काळ बदलतोय, आणि कामांची स्वरूपंही!

कधी काळी गावातील मोठे नेते अनेक लग्न जुळवायचे. ही गोष्ट केवळ सामाजिक नव्हती, तर ती माणसं जोडण्याची एक सुंदर पद्धत होती. पण ही परंपरा हळूहळू मागे पडली… आणि आता तर पारच हरवून गेलीय.

आज विवाह संस्थांच्या माध्यमातून लग्न जुळवली जातात, पण त्यासाठी हजारोंची नोंदणी फी भरावी लागते. तरीही मुलं-मुलींचं जुळणं अवघडच आहे.
मुलींच्या अपेक्षा दिवसेंदिवस वाढत आहेत — सरकारी नोकरी, पुणे-मुंबईत स्वतःचं घर, एकटं राहणारा नवरा…
तर दुसरीकडे, गावांमध्ये चांगले, कष्टाळू, निर्व्यसनी मुलं असूनही त्यांचं लग्न जमत नाही!

हे फक्त एका व्यक्तीचं दु:ख नाही, ही समाजाची गंभीर समस्या बनली आहे. त्यामुळे यामध्ये राजकारण्यांनीही आता सक्रिय भूमिका घेतली पाहिजे.

माझं वैयक्तिक मत –

जो ग्रामपंचायत लढवणार असेल, त्याने 5 लग्नं जमवावीत.

जो सरपंच होऊ इच्छितो, त्याने 15 जोड्या जोडाव्यात.

पंचायत समितीसाठी 50, जिल्हा परिषदसाठी 100 आणि

विधानसभेच्या इच्छुक उमेदवाराने किमान 500 लग्न जुळवावीत!

ही केवळ शिफारस नाही, ही आजच्या समाजाच्या गरजांची जाणीव आहे.

राजकारण म्हणजे जनसेवा आणि आज जनतेला सर्वात जास्त गरज आहे – लग्न जमवण्याच्या मदतीची!
परळी विधानसभा मतदारसंघातून राजेसाहेब देशमुख यांनी भर सभेत जाहीर केलं होतं – “मी निवडून आलो, तर एकही मुलगा अविवाहित राहणार नाही!”
हे वक्तव्य ऐकताना लोकांनी हसलं असेल, पण खरं तर त्यांनी समाजाच्या नस पकडली होती!

जर राजकारणी लोकांनी या विषयात लक्ष घातलं, तर एक नवा सामाजिक बदल घडवून आणता येईल.
अन्यथा, ही अविवाहित तरुण पिढी उद्याचे सर्वात मोठे राजकीय आव्हान ठरू शकते!

Previous Post

राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी तुळजाभवानी मातेचे घेतले दर्शन

Next Post

चिखली येथील उ.बा.ठा गटाच्या अनेक युवकांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

Related Posts

धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा पेच: भाजप-शिवसेनेत काटाजोड; अर्चनाताई पाटील की उषा गायकवाड?
राजकीय

धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा पेच: भाजप-शिवसेनेत काटाजोड; अर्चनाताई पाटील की उषा गायकवाड?

10 March 2026
भूम तालुक्यातील ५ जिल्हा परिषद गटात ७० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात,अंतिम चित्र 27 तारखेला स्पष्ट होणार
राजकीय

भूम तालुक्यातील ५ जिल्हा परिषद गटात ७० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात,अंतिम चित्र 27 तारखेला स्पष्ट होणार

23 January 2026
तेरखेडा जिल्हा परिषद गटातून भाजपकडून प्रवीण घुले इच्छुक
राजकीय

तेरखेडा जिल्हा परिषद गटातून भाजपकडून प्रवीण घुले इच्छुक

9 January 2026
इच्छुकांना नगरपालिका  निवडणुकांनंतर आता वेध जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे
राजकीय

इच्छुकांना नगरपालिका निवडणुकांनंतर आता वेध जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे

27 December 2025
नगरपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर
राजकीय

नगरपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

4 November 2025
धाराशिव शहर खड्डेमुक्त होणार!राजमाता जिजाऊ चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक ते सांजा रोड भवानी चौक रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन
राजकीय

धाराशिव शहर खड्डेमुक्त होणार!राजमाता जिजाऊ चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक ते सांजा रोड भवानी चौक रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

1 November 2025
Next Post
चिखली येथील उ.बा.ठा गटाच्या अनेक युवकांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

चिखली येथील उ.बा.ठा गटाच्या अनेक युवकांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

Recent Posts

  • आमदार डॉ.तानाजीराव सावंतांचा’ एक फोन अन् अवघ्या २४ तासांत विद्यार्थ्यांचा प्रश्न मार्गी…..
  • सोशल मीडियावर नाराजी व्यक्त करू नका; मतभेद संघटनेच्या व्यासपीठावरच मांडा – दत्ताभाऊ कुलकर्णी यांचे भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
  • “ओमराजे वाघ नव्हे, लांडगा निघाला”; धाराशिवमध्ये उद्धव ठाकरेंचा घणाघात
  • १८ कोटींच्या निधीवरून धाराशिवमध्ये श्रेयवाद; खा.ओमराजे-आ.राणा पाटील यांच्यातील लेटर वॉर पुन्हा चर्चेत
  • धाराशिव जिल्ह्यातील शिवसेना, युवासेना, महिला सेना व अंगीकृत संघटनांच्या कार्यकारिण्या बरखास्त; नव्या नेतृत्वाला संधी मिळण्याची शक्यता?

Recent Comments

No comments to show.

Counter

489040
Users Today : 32
Users Yesterday : 34
This Month : 1119
Total Users : 36405
  • Home Page

© 2024 Rajkiya Katta - Design and Developed by DK Techno's.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान

© 2024 Rajkiya Katta - Design and Developed by DK Techno's.

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group