धाराशिव जिल्ह्यातील आठ नगरपालिका निवडणुका नुकत्याच पार पडल्या असून, यामध्ये 189 नगरसेवक आणि 8 नगराध्यक्ष पदांवर निवड झाली आहे. हा पहिला मोठा राजकीय टप्पा पूर्ण झाल्यानंतर आता जिल्ह्यातील राजकीय कार्यकर्ते, पदाधिकारी व नेत्यांचे लक्ष जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांकडे केंद्रित झाले आहे.
धाराशिव जिल्ह्यात एकूण 55 जिल्हा परिषद गट आणि 110 पंचायत समिती गणांसाठी निवडणुका होणार आहेत. तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे.
धाराशिव तालुका: 12 जिल्हा परिषद गट, 24 पंचायत समिती गण
कळंब तालुका: 8 जिल्हा परिषद गट, 16 पंचायत समिती गण
तुळजापूर तालुका: 9 जिल्हा परिषद गट, 18 पंचायत समिती गण
उमरगा तालुका: 9 जिल्हा परिषद गट, 18 पंचायत समिती गण
लोहारा तालुका: 4 जिल्हा परिषद गट, 8 पंचायत समिती गण
भूम तालुका 5 जिल्हा परिषद गट, 10 पंचायत समिती गण
परांडा तालुका 5 जिल्हा परिषद गट, 10 पंचायत समिती गण
वाशी तालुका: 3 जिल्हा परिषद गट, 6 पंचायत समिती गण
अशा प्रकारे जिल्हाभरात एकूण 165 लोकप्रतिनिधी स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून येणार आहेत. ग्रामीण भागाशी थेट निगडित असलेली ही निवडणूक असल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह असून, ही लढत मोठ्या जोशात पार पडण्याची चिन्हे आहेत.
विशेष म्हणजे 2017 नंतर जवळपास नऊ वर्षांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका होत असल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड ऊर्जा आणि उत्साह दिसून येत आहे. मात्र, 2022 मध्ये इच्छुक असलेले काही पदाधिकारी यावेळी तुलनेने मागे राहिल्याचे चित्र आहे. त्याउलट, तरुणाईमध्ये या निवडणुकीबाबत मोठा उत्साह असून, “काहीही झालं तरी निवडणूक लढवायचीच” असा निर्धार अनेकांनी केला आहे.
आता संपूर्ण राजकीय गणित निवडणूक आयोगाकडून होणाऱ्या अधिकृत घोषणेकडे लागले असून, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची घोषणा कधी होते, यावरच पुढील राजकीय हालचाली अवलंबून राहणार आहेत.












Users Today : 14
Users Yesterday : 27
This Month : 984
Total Users : 33828