Monday, December 22, 2025
rajkiyakatta.in
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान
No Result
View All Result
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान
No Result
View All Result
rajkiyakatta.in
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान

आपल्या हक्काचे पाणी आणायचं असेल तर महायुतीच्या अर्चनाताई यांना निवडून द्या-मा.आ. सुजितसिंह ठाकूर

Rajkiy Katta by Rajkiy Katta
4 May 2024
in राजकीय
0
आपल्या हक्काचे पाणी आणायचं असेल तर महायुतीच्या अर्चनाताई यांना निवडून द्या-मा.आ. सुजितसिंह ठाकूर
0
SHARES
16
VIEWS

धाराशिव राजकीय कट्टा वृत्तसेवा-

लोकसभा निवडणुकीचा प्रचार जोमात सुरू आहे. धाराशिव लोकसभेसाठी येत्या 7 मे रोजी मतदान होणार आहे. दुष्काळ आपल्या पाचवीला पूजलेला आहे. त्यामुळे आपल्या भागात आपल्या हक्काच पाणी आणायच असेल तर केंद्रात आपल्या विचारांचे सरकार असणे आवश्यक आहे. यासाठी आपल्या भागातून महायुतीचा उमेदवार खासदार म्हणून संसदेत पाठवण्याची आपली जबाबदारी आहे असे आवाहन माजी आमदार सुजितसिंह ठाकुर यांनी मतदारांना केले.

धाराशिव लोकसभा मतदार संघातील महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचारासाठी कौडगाव जवळा ता.परंडा येथे प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी आमदार सुजितसिंह ठाकुर बोलत होते. यावेळी महायुतीच्या उमेदवार अर्चनाताई पाटील शिवसेनेचे युवानेते व माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष धनंजय सावंत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्तात्रय साळुंके, शिवसेना संघटक जयदेव गोफणे उपस्थित होते.

ठाकूर म्हणाले, जेव्हा मी पहिल्यांदा आमदार झालो तेंव्हा मी येथील दुष्काळ घालवण्याचा संकल्प केला होता. त्यापूर्वी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मी येथील दुष्काळावर एक पत्र लिहिले होते. त्यावर फडणवीस यांनी कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाची बैठक लावली. त्यात आमच्या पाणी आडवण्याच्या मर्यादा संपल्यात पाणी साठा उपलब्ध नाही. असे सर्व मुद्दे मी मांडले. तेव्हा ‘मराठवाड्याचा पोपट मी मरू देणार नाही. पाण्यासाठी आवश्यक ती सगळी मदत करू’, असे आश्वासन त्यांनी दिले. सुदैवाने तेव्हा प्रकाश जावडेकर पर्यावरण मंत्री होते. त्यांनी तात्काळ बैठक बोलावून सिंचन योजनेवरील बंदी उठवली. त्यानंतर पाणी उपलब्धता प्रमाणपत्र मिळवलं. आता आपल्याला 7 टीएमसी पाणी मिळत आहे. केंद्रात आणि राज्यात एकाच सरकार असले की निर्णय असे जलद गतीने होतात.  

धनंजय सावंत म्हणाले, महायुतीचा उमेदवार जाहीर होण्यापूर्वी आम्ही उमेदवार बदलावा म्हणून खूप प्रयत्न केले पण वाटाघाटी करताना धाराशिवची जागा  राष्ट्रवादीच्या वाट्याला आली आणि माझी उमेदवारी कटली. पण महायुतीचा धर्म आम्ही पाळणार आहोत. मंत्री तानाजी सावंत यांनी शब्द दिल्या प्रमाणे आम्ही शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते महायुतीचा उमेदवार म्हणून अर्चनाताईंचा मोठ्या प्रमाणात प्रचार करणार आहोत असा शब्द यावेळी दिला.

Previous Post

मराठायोद्धा मनोज जरांगे पाटील यांची आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी घेतली भेट

Next Post

चाळीस वर्षातील पाटील घराण्याच्या सत्ता काळात 25 वर्ष स्व.पवनराजे हेच कारभारी होते-पाटील दांपत्याचा प्रहार

Related Posts

नगरपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर
राजकीय

नगरपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

4 November 2025
धाराशिव शहर खड्डेमुक्त होणार!राजमाता जिजाऊ चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक ते सांजा रोड भवानी चौक रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन
राजकीय

धाराशिव शहर खड्डेमुक्त होणार!राजमाता जिजाऊ चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक ते सांजा रोड भवानी चौक रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

1 November 2025
“धाराशिवच्या विकासामध्ये राजकारण नको!”-राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे प्रदेश सरचिटणीस डॉ. प्रतापसिंह पाटील
राजकीय

“धाराशिवच्या विकासामध्ये राजकारण नको!”-राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे प्रदेश सरचिटणीस डॉ. प्रतापसिंह पाटील

31 October 2025
धाराशिव जिल्हा युवती सेना प्रमुखपदी श्वेताताई सागर दुरुगकर यांची नियुक्ती
राजकीय

धाराशिव जिल्हा युवती सेना प्रमुखपदी श्वेताताई सागर दुरुगकर यांची नियुक्ती

29 October 2025
हा आनंद म्हणजे शहराच्या प्रगतीच्या विरोधातील मानसिकतेचा पुरावा- भाजप युवा जिल्हाध्यक्ष राहुल काकडे
राजकीय

हा आनंद म्हणजे शहराच्या प्रगतीच्या विरोधातील मानसिकतेचा पुरावा- भाजप युवा जिल्हाध्यक्ष राहुल काकडे

29 October 2025
भाजपा युवा नेते शंतनू पायाळ यांनी आयोजित केलेला नोकरी महोत्सव व स्वयंरोजगार मेळावा उत्साहात संपन्न
राजकीय

भाजपा युवा नेते शंतनू पायाळ यांनी आयोजित केलेला नोकरी महोत्सव व स्वयंरोजगार मेळावा उत्साहात संपन्न

28 October 2025
Next Post
चाळीस वर्षातील पाटील घराण्याच्या सत्ता काळात 25 वर्ष स्व.पवनराजे हेच कारभारी होते-पाटील दांपत्याचा प्रहार

चाळीस वर्षातील पाटील घराण्याच्या सत्ता काळात 25 वर्ष स्व.पवनराजे हेच कारभारी होते-पाटील दांपत्याचा प्रहार

Recent Posts

  • धाराशिव राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) जिल्हाध्यक्षपदी डॉ.प्रतापसिंह पाटील यांची नियुक्ती
  • नगरपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर
  • राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आज घोषणा होणार!
  • जय हनुमान ग्रुपचे अध्यक्ष सुरेश कांबळे यांचे राजकारणात पुनरागमन होणार?
  • धाराशिव शहर खड्डेमुक्त होणार!राजमाता जिजाऊ चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक ते सांजा रोड भवानी चौक रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

Recent Comments

No comments to show.

Counter

479887
Users Today : 32
Users Yesterday : 67
This Month : 1824
Total Users : 27252
  • Home Page

© 2024 Rajkiya Katta - Design and Developed by DK Techno's.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान

© 2024 Rajkiya Katta - Design and Developed by DK Techno's.

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group