Monday, December 22, 2025
rajkiyakatta.in
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान
No Result
View All Result
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान
No Result
View All Result
rajkiyakatta.in
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सहकार्याने आपल्या भागाचे प्रश्न निश्चित सोडवू- आ.राणाजगजितसिंह पाटील

Rajkiy Katta by Rajkiy Katta
23 April 2024
in राजकीय
0
0
SHARES
3
VIEWS

धाराशिव बाणगंगा टाइम्स-

  धाराशिव परिसर हा दुष्काळग्रस्त भाग असून शाश्वत पाण्यासह रोजगार निर्मिती हा येथील प्रमुख प्रश्न आहे. केंद्राच्या विचारांचा खासदार आपल्या परिसरातून गेला तर हे प्रश्न सोडवले जाऊ शकतात. त्यामुळे आमचा लढा हा धाराशिव लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी आहे,  या भागांचा सर्वांगीण विकासाचे हे स्वप्न पूर्ण होईपर्यंत तो लढा चालूच राहणार, असा निर्धार भाजप नेते आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला.

औसा येथे महायुती जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी राणा जगजितसिंह पाटील बोलत होते. याप्रसंगी आमदार अभिमन्यू पवार, माजी आमदार बसवराज पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. 

पुढे बोलताना राणा जगजितसिंह पाटील म्हणाले, खासदाराचं काम काय असतं? तर केंद्र सरकारचा मोठा प्रकल्प आपल्या भागात आणणं. केंद्र सरकारच्या निधीतून आपल्या विभागाची विकास काम करून घेणे, काही अडचणीचे विषय केंद्राशी संबंधित असतील तर आपले प्रश्न संसदेत मांडून ते प्रश्न सोडवून घेणे. या तीन पैकी आपल्या मतदारसंघात कुठलं काम विद्यमान खासदारांनी केले आहे? याबाबतीत चर्चा होणे गरजेचे आहे. या भागात आपल्याला एमआयडीसी आणायची आहे. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचा विषय आहे, तो म्हणजे शाश्वत पाण्याचा आणि हे पाणी आपल्याला कोण आणून देईल तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.  हे आपल्या राज्याचे प्रतिनिधी केंद्र सरकारशी बोलून म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मदतीने आपल्या विभागात शाश्वत पाण्याचा प्रश्न सोडवू शकतात. यासोबतच थोडा पुढचा विचार करू सांगली व कोल्हापूरच्या पुराचं पाणी 100 किलोमीटरच्या बोगदा करून दुष्काळी भाग असलेल्या धाराशिव आणि मराठवाड्याच्या पट्ट्यात शेतीसाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी आणायचं आहे. म्हणजे एकीकडे शाश्वत पाणी आणि दुसरीकडे उद्योग, रोजगार निर्मिती आणि त्या माध्यमातून आपल्या भागातील अर्थकारणाला चालना देणे हे महत्त्वाचं आहे. हे सगळं नरेंद्र मोदी यांच्यामुळे शक्य होणार असल्याचे पाटील यांनी नमूद केले. 

पुढे बोलताना ते म्हणाले,  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या पाच वर्षात अर्थकारणाबाबत जी रणनीती आखली ज्यामुळे आपली अर्थव्यवस्था आठव्या क्रमांकावरून पाचव्या  क्रमांकावर गेली आहे.  पुढच्या पाच वर्षात आपल्याला आपली देशाची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर नेऊन ठेवायचे आहे.

तसेच अवकाळी पावसाने झालेल्या शेतीच्या नुकसान भरपाई बाबाबाद बोलताना पाटील  म्हणाले,   अवकाळी पावसामुळे आपल्या भागात देखील अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. राज्य सरकारने याची दखल घेतली असून तातडीने पंचनामे  करण्याचे आदेश दिले आहेत.  कॅबिनेटने सोयाबीनच्या बाबतीत साडेचार हजार कोटी रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय घेतला असल्याचेही पाटील यांनी सांगितले.

Tags: AjitpawarArchanataipatilBJpNCP
Previous Post

केंद्र सरकारकडून काय काम करून घ्यायचे तेच आपल्या खासदारांना कळले नाही -आ.राणाजगजिसिह पाटील

Next Post

अर्चनाताईचा फॉर्म भरायला आलेली गर्दी बघून विरोधकांचे धाबे दणाणले -मल्हार पाटील

Related Posts

नगरपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर
राजकीय

नगरपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

4 November 2025
धाराशिव शहर खड्डेमुक्त होणार!राजमाता जिजाऊ चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक ते सांजा रोड भवानी चौक रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन
राजकीय

धाराशिव शहर खड्डेमुक्त होणार!राजमाता जिजाऊ चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक ते सांजा रोड भवानी चौक रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

1 November 2025
“धाराशिवच्या विकासामध्ये राजकारण नको!”-राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे प्रदेश सरचिटणीस डॉ. प्रतापसिंह पाटील
राजकीय

“धाराशिवच्या विकासामध्ये राजकारण नको!”-राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे प्रदेश सरचिटणीस डॉ. प्रतापसिंह पाटील

31 October 2025
धाराशिव जिल्हा युवती सेना प्रमुखपदी श्वेताताई सागर दुरुगकर यांची नियुक्ती
राजकीय

धाराशिव जिल्हा युवती सेना प्रमुखपदी श्वेताताई सागर दुरुगकर यांची नियुक्ती

29 October 2025
हा आनंद म्हणजे शहराच्या प्रगतीच्या विरोधातील मानसिकतेचा पुरावा- भाजप युवा जिल्हाध्यक्ष राहुल काकडे
राजकीय

हा आनंद म्हणजे शहराच्या प्रगतीच्या विरोधातील मानसिकतेचा पुरावा- भाजप युवा जिल्हाध्यक्ष राहुल काकडे

29 October 2025
भाजपा युवा नेते शंतनू पायाळ यांनी आयोजित केलेला नोकरी महोत्सव व स्वयंरोजगार मेळावा उत्साहात संपन्न
राजकीय

भाजपा युवा नेते शंतनू पायाळ यांनी आयोजित केलेला नोकरी महोत्सव व स्वयंरोजगार मेळावा उत्साहात संपन्न

28 October 2025
Next Post
अर्चनाताईचा फॉर्म भरायला आलेली गर्दी बघून विरोधकांचे धाबे दणाणले -मल्हार पाटील

अर्चनाताईचा फॉर्म भरायला आलेली गर्दी बघून विरोधकांचे धाबे दणाणले -मल्हार पाटील

Recent Posts

  • धाराशिव राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) जिल्हाध्यक्षपदी डॉ.प्रतापसिंह पाटील यांची नियुक्ती
  • नगरपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर
  • राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आज घोषणा होणार!
  • जय हनुमान ग्रुपचे अध्यक्ष सुरेश कांबळे यांचे राजकारणात पुनरागमन होणार?
  • धाराशिव शहर खड्डेमुक्त होणार!राजमाता जिजाऊ चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक ते सांजा रोड भवानी चौक रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

Recent Comments

No comments to show.

Counter

479887
Users Today : 32
Users Yesterday : 67
This Month : 1824
Total Users : 27252
  • Home Page

© 2024 Rajkiya Katta - Design and Developed by DK Techno's.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान

© 2024 Rajkiya Katta - Design and Developed by DK Techno's.

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group