Friday, May 29, 2026
rajkiyakatta.in
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान
No Result
View All Result
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान
No Result
View All Result
rajkiyakatta.in
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान

स्थगिती देणार फडणवीस सरकार आणि दोष आमच्यावर? – शिवसेना(UBT) प्रवक्ता तानाजी जाधवर

Rajkiy Katta by Rajkiy Katta
29 October 2025
in Blog
0
स्थगिती देणार फडणवीस सरकार आणि दोष आमच्यावर? – शिवसेना(UBT) प्रवक्ता तानाजी जाधवर
0
SHARES
54
VIEWS

“चोराच्या उलट्या बोंबा, राणा पाटील यांचा रडका प्रकार सुरूच”-शिवसेना (ठाकरे गट) प्रवक्त्यांचा सत्ताधाऱ्यांवर टोला

धाराशिव, दि. २९ ऑक्टोबर:
धाराशिव शहरातील १४० कोटी रुपयांच्या रस्ते विकासकामांना कार्यारंभ आदेश मिळाल्यानंतर फडणवीस सरकारने स्थगिती दिली, तरीही याचा दोष विरोधकांवर ढकलला जात आहे — हे “चोराच्या उलट्या बोंबा” सारखे असल्याचा घणाघाती आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हा प्रवक्ते तानाजी जाधवर यांनी केला आहे.


भाजप आणि राणाजगजित सिंह पाटील यांच्यावर निशाणा

जाधवर म्हणाले,

“निधी मंजूर झाला की श्रेय स्वतः घ्यायचे, पण मनासारखे झाले नाही की दोष आमच्यावर ढकलायचा — हा रडका प्रकार आता जिल्ह्यात सुरू आहे. राणा पाटील हे सातत्याने याच पद्धतीने राजकारण करत आहेत.”

त्यांनी पुढे सांगितले की, विरोधात असलेल्या आमदार-खासदारांशी सत्ताधारी मंडळी कशी वागतात हे सर्वांनाच ठाऊक आहे. रस्त्यांच्या निधीबाबत तत्कालीन पालकमंत्री तानाजी सावंत आणि भाजप आमदार राणा पाटील यांच्यातच “श्रेयवाद” सुरू होता.


२० महिन्यांनंतरही कामे ठप्प

“फेब्रुवारी २०२४ पासून निविदा प्रक्रियेस तब्बल २० महिने लागले. या प्रक्रियेत अनियमितता झाल्याचे त्यांच्याच मित्रपक्षाकडून बोलले जात आहे. जिल्हा नियोजन समितीच्या कामांना स्थगिती देऊन गर्व माजवणारे आता स्वतःच्या सरकारने रस्त्यांच्या कामांना स्थगिती दिल्यावर मात्र विरोधकांवर दोष टाकत आहेत — हे हास्यास्पद आहे,” असा टोला त्यांनी लगावला.

“दुकान तुमचं, दुकानदारी तुमची आणि तोटा झाला आमच्यामुळे — हे कुणालाही पटेल का?” असा प्रश्न जाधवर यांनी उपस्थित केला.


“स्थगिती देणारे तुम्हीच”

जाधवर पुढे म्हणाले,

“जुलै २०२२ ला महाविकास आघाडीचे सरकार पडून महायुतीचे सरकार आले. त्याच सत्ताधाऱ्यांनी मागील आघाडी सरकारच्या सर्व कामांना स्थगिती दिली होती. न्यायालयाने आदेश दिल्यानंतरही ती स्थगिती उठवली नाही. मग जर आमच्या मताला एवढं महत्त्व असतं, तर कामे रद्द झाली नसती.”

त्यांनी स्पष्ट केले की, सध्याच्या सरकारने रस्ते, तीन बगीचा, आठवडी बाजार अशीच जुनी कामे पुन्हा मंजूर केली, पण अजूनही एकही काम प्रत्यक्षात सुरू झालेले नाही.


“गुत्तेदार अपात्र असूनही प्रयत्न — हीच खरी प्रवृत्ती”

जाधवर म्हणाले,

“ज्यांना दुसऱ्यांची प्रवृत्ती सांगायची आहे, त्यांनी स्वतःकडे बघावे. एक गुत्तेदार अपात्र असूनही त्याला पुन्हा पात्र करण्यासाठी वीस महिने धडपड केली — हीच त्यांची खरी प्रवृत्ती आहे. काळ याचे उत्तर देईल.”

त्यांनी भाजप आमदारांवर टीका करताना म्हटले की, “माझ्याच मनासारखं झालं तर ठीक, नाहीतर काहीच होऊ द्यायचं नाही” या मनोवृत्तीमुळे जिल्ह्याचे नुकसान होत आहे.


“रस्त्यांची कामे व्हावीत, हीच आमची भूमिका”

“आम्ही एसआयटी चौकशीची मागणी केली आहे. त्यात दोष कोणाचा आहे, हे स्पष्ट होईल. पण शहरवासीयांचे वीस महिन्यांपासून चाललेले हाल थांबावेत आणि रस्त्यांची कामे लवकर सुरू व्हावीत, हीच आमची प्रामाणिक भावना आहे,” असे जाधवर यांनी सांगितले.

Previous Post

हा आनंद म्हणजे शहराच्या प्रगतीच्या विरोधातील मानसिकतेचा पुरावा- भाजप युवा जिल्हाध्यक्ष राहुल काकडे

Next Post

धाराशिव जिल्हा युवती सेना प्रमुखपदी श्वेताताई सागर दुरुगकर यांची नियुक्ती

Related Posts

उस्मानाबाद–लातूर–बीड विधान परिषदेसाठी भाजपमध्ये मोर्चेबांधणी; सुनील चव्हाण आघाडीवर
Blog

उस्मानाबाद–लातूर–बीड विधान परिषदेसाठी भाजपमध्ये मोर्चेबांधणी; सुनील चव्हाण आघाडीवर

20 May 2026
“धाराशिवच्या विकासामध्ये राजकारण नको!”-राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे प्रदेश सरचिटणीस डॉ. प्रतापसिंह पाटील
Blog

स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून डॉ.प्रतापसिंह पाटील यांना उमेदवारी देण्याची कार्यकर्त्यांची जोरदार मागणी

18 May 2026
आ.डॉ.तानाजीराव सावंत यांनी दिलेला शब्द पाळला; तेरखेडा जिल्हा परिषद गटातील शेतरस्त्यांच्या कामांना गती
Blog

आ.डॉ.तानाजीराव सावंत यांनी दिलेला शब्द पाळला; तेरखेडा जिल्हा परिषद गटातील शेतरस्त्यांच्या कामांना गती

15 May 2026
शिवसेनेत सुरज साळुंखे यांच्यावर मोठी जबाबदारी
Blog

शिवसेनेत सुरज साळुंखे यांच्यावर मोठी जबाबदारी

15 May 2026
भारतीय जनता पार्टीकडून धाराशिव जिल्ह्यातील आठ मंडळ अध्यक्षांची नवीन नियुक्ती
Blog

भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी विधानपरिषदेवर जाणार?

22 April 2026
शिवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुख भारतीताई गायकवाड यांना विधानपरिषदेवर संधी देण्याची शिवसेना महिला आघाडीची मागणी
Blog

शिवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुख भारतीताई गायकवाड यांना विधानपरिषदेवर संधी देण्याची शिवसेना महिला आघाडीची मागणी

22 April 2026
Next Post
धाराशिव जिल्हा युवती सेना प्रमुखपदी श्वेताताई सागर दुरुगकर यांची नियुक्ती

धाराशिव जिल्हा युवती सेना प्रमुखपदी श्वेताताई सागर दुरुगकर यांची नियुक्ती

Recent Posts

  • उस्मानाबाद–लातूर–बीड विधान परिषदेसाठी भाजपमध्ये मोर्चेबांधणी; सुनील चव्हाण आघाडीवर
  • स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून डॉ.प्रतापसिंह पाटील यांना उमेदवारी देण्याची कार्यकर्त्यांची जोरदार मागणी
  • आ.डॉ.तानाजीराव सावंत यांनी दिलेला शब्द पाळला; तेरखेडा जिल्हा परिषद गटातील शेतरस्त्यांच्या कामांना गती
  • शिवसेनेत सुरज साळुंखे यांच्यावर मोठी जबाबदारी
  • भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी विधानपरिषदेवर जाणार?

Recent Comments

No comments to show.

Counter

486606
Users Today : 23
Users Yesterday : 20
This Month : 1127
Total Users : 33971
  • Home Page

© 2024 Rajkiya Katta - Design and Developed by DK Techno's.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान

© 2024 Rajkiya Katta - Design and Developed by DK Techno's.

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group