धाराशिव राजकीय कट्टा वृत्तसेवा-
विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून महाविकास आघाडीकडून विद्यमान आ.कैलास पाटील यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. त्यांना टक्कर देण्यासाठी कोणता पैलवान मैदानात उतरवायचा याची महायुतीकडून चाचपणी होत असताना अनेक नाव समोर येत आहेत.या सर्व नावामध्ये एकमत होईल की नाही हे अद्याप सांगता येत नाही. मात्र विश्वसनीय गोटातून मिळालेल्या माहितीनुसार ऐनवेळी सावंत परिवाराचा उमेदवार असण्याची शक्यता आहे.

तेरणा शेतकरी साखर कारखान्याचा शेतकरी मेळावा झाला आणि त्या शेतकरी मेळाव्याचे नियोजन भैरवनाथचे कार्यकारी संचालक केशव सावंत यांनी केले होते. तसेच अनेक कार्यक्रमात पडद्याआड राहून भूमिका बजावण्यात केशव सावंत हे अग्रेसर दिसून येतात.आरोग्यमंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.तानाजी सावंत यांनी तेरणा शेतकरी साखर कारखाना भाडेतत्त्वावर घेतला मात्र तो चांगल्या पद्धतीने चालवण्याचे आव्हान हे सावंत यांच्यासमोर होते. जवळपास बारा वर्षे तेरणा कारखाना हा बंद होता आणि तो सुरू करण्याची जबाबदारी केशव सावंत यांच्या खांद्यावर आली आणि त्यांनी तेरणाचा पहिला हंगाम यशस्वीरित्या पूर्ण करून दाखवला. त्यामुळे जरी त्यांच्यावर आज कोणती राजकीय जबाबदारी नसली तरी देखील सहकारातील डीसीसी बँकेचे संचालक पद त्यांच्याकडे आहे आणि अनेक इच्छुक उमेदवार मी नसेल तर केशव सावंत यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी करणार असल्याची कुजबुज कार्यकर्त्यांमधून दिसून येत आहे.













Users Today : 20
Users Yesterday : 36
This Month : 1297
Total Users : 30982