Friday, December 19, 2025
rajkiyakatta.in
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान
No Result
View All Result
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान
No Result
View All Result
rajkiyakatta.in
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान

जय हनुमान ग्रुपचे अध्यक्ष सुरेश कांबळे यांचे राजकारणात पुनरागमन होणार?

Rajkiy Katta by Rajkiy Katta
2 November 2025
in Blog
0
जय हनुमान ग्रुपचे अध्यक्ष सुरेश कांबळे यांचे राजकारणात पुनरागमन होणार?
0
SHARES
2k
VIEWS

कोर्टाच्या दिलाश्यानंतर लवकरच भूम-परंडा-वाशी विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांची बैठक

फैयाज शेख आत्महत्या प्रकरणात नाव आल्यानंतर गेल्या दीड ते दोन वर्षांपासून सक्रिय राजकारणापासून थोडेसे दूर असलेले जय हनुमान ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सुरेश उर्फ सूर्यकांत कांबळे हे पुन्हा एकदा निवडणुकीच्या पिचवर खेळण्यासाठी सज्ज झाले आहेत. लवकरच भूम-परंडा-वाशी या विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांची बैठक घेऊन पुढील राजकीय दिशा ठरवतील, अशी चर्चा सध्या रंगली आहे.

२०१७ साली झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांच्या वहिनी छाया कांबळे यांनी सुकटा जिल्हा परिषद गटातून शिवसेना पक्षाच्या वतीने निवडणूक लढवली होती. त्या निवडणुकीत त्या जिल्ह्यात सर्वाधिक मतांनी विजयी झाल्या होत्या. त्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत देखील छाया कांबळे यांना शिवसेनेच्या वतीने उमेदवारी देण्यात आली होती. मात्र अनेक नाट्यमय घडामोडीनंतर त्या वेळी नेताजी पाटील हे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले होते.

२०१९ ची विधानसभा निवडणूक वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून सुरेश कांबळे यांनी लढवली होती आणि त्या निवडणुकीत त्यांनी सुमारे २८०००पेक्षा जास्त मते मिळवली होती.त्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपला गट कायम ठेवला होता.

२०२४ च्या विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी त्यांना एका गुन्ह्यातून जामीन मिळाल्यानंतर गावोगाव त्यांच्या मिरवणुका काढण्यात आल्या.त्यानंतर फैयाज शेख आत्महत्या प्रकरण घडले. या प्रकरणात नाव आल्याने कांबळेंना काही काळ अडचणींना सामोरे जावे लागले. आता मात्र त्या गुन्ह्यातून उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नाव वगळल्याने सुरेश कांबळे पुन्हा निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत, अशी चर्चा सुरू आहे.

भूम तालुक्यातील पाचपैकी तीन जिल्हा परिषद गट हे ओबीसी प्रवर्गासाठी राखीव आहेत. यामध्ये सुकटा व वालवड हे गट महिलांसाठी आरक्षित, तर पाथरूड गट ओबीसी प्रवर्गासाठी राखीव आहे. त्यामुळे कांबळे यांच्या दृष्टीने हे तीनही मतदारसंघ लढवण्यासाठी अनुकूल आहेत.

यापूर्वी त्यांच्या नेतृत्वाखाली सुकटा गटातून मोठ्या मतांनी विजय मिळवला असल्याने, जर घरातील महिला उमेदवार द्यायची ठरवली तर त्या गटात उमेदवारी शक्य आहे. मात्र कांबळे यांचे गाव वालवड जिल्हा परिषद गटात येत असल्याने, तडजोडीच्या राजकारणात तेथूनही लढवले जाऊ शकतात. स्वतः लढवण्याचा निर्णय घेतल्यास, पाथरूड जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.

यामुळे सुरेश कांबळे यांचे राजकारणात पुनरागमन जवळपास निश्चित झाले असून, त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा एकदा ऊर्जा आणि हालचाल निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.

Previous Post

धाराशिव शहर खड्डेमुक्त होणार!राजमाता जिजाऊ चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक ते सांजा रोड भवानी चौक रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

Next Post

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आज घोषणा होणार!

Related Posts

धाराशिव राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) जिल्हाध्यक्षपदी डॉ.प्रतापसिंह पाटील यांची नियुक्ती
Blog

धाराशिव राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) जिल्हाध्यक्षपदी डॉ.प्रतापसिंह पाटील यांची नियुक्ती

5 November 2025
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आज घोषणा होणार!
Blog

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आज घोषणा होणार!

4 November 2025
स्थगिती देणार फडणवीस सरकार आणि दोष आमच्यावर? – शिवसेना(UBT) प्रवक्ता तानाजी जाधवर
Blog

स्थगिती देणार फडणवीस सरकार आणि दोष आमच्यावर? – शिवसेना(UBT) प्रवक्ता तानाजी जाधवर

29 October 2025
तेरखेडा जिल्हा परिषद गटासाठी पैलवान ग्रुपचे अध्यक्ष विकी चव्हाण यांची दावेदारी मजबूत
Blog

तेरखेडा जिल्हा परिषद गटासाठी पैलवान ग्रुपचे अध्यक्ष विकी चव्हाण यांची दावेदारी मजबूत

14 October 2025
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार-डॉ.प्रतापसिंह पाटील
Blog

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)पदवीधर मतदारसंघासाठी पात्र पदवीधरांनी नोंदणी करावी – डॉ. प्रतापसिंह पाटील यांचे आवाहन

7 October 2025
चिंचपूर ढगे येथे शेतकरी असलेल्या विश्वनाथ जाधव यांच्याकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वीस हजार रुपयांची मदत
Blog

चिंचपूर ढगे येथे शेतकरी असलेल्या विश्वनाथ जाधव यांच्याकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वीस हजार रुपयांची मदत

28 September 2025
Next Post
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आज घोषणा होणार!

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आज घोषणा होणार!

Recent Posts

  • धाराशिव राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) जिल्हाध्यक्षपदी डॉ.प्रतापसिंह पाटील यांची नियुक्ती
  • नगरपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर
  • राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आज घोषणा होणार!
  • जय हनुमान ग्रुपचे अध्यक्ष सुरेश कांबळे यांचे राजकारणात पुनरागमन होणार?
  • धाराशिव शहर खड्डेमुक्त होणार!राजमाता जिजाऊ चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक ते सांजा रोड भवानी चौक रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

Recent Comments

No comments to show.

Counter

479650
Users Today : 11
Users Yesterday : 77
This Month : 1587
Total Users : 27015
  • Home Page

© 2024 Rajkiya Katta - Design and Developed by DK Techno's.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान

© 2024 Rajkiya Katta - Design and Developed by DK Techno's.

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group