Monday, December 22, 2025
rajkiyakatta.in
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान
No Result
View All Result
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान
No Result
View All Result
rajkiyakatta.in
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान

गेली ३५ वर्षे विरोधकांना पाणी आणता आलं नाही,फक्त लोकांना फसवलं-डॉ.तानाजीराव सावंत

Rajkiy Katta by Rajkiy Katta
13 November 2024
in राजकीय
0
गेली ३५ वर्षे विरोधकांना पाणी आणता आलं नाही,फक्त लोकांना फसवलं-डॉ.तानाजीराव सावंत
0
SHARES
85
VIEWS

  • देवळाली येथील जाहीर सभेतून प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांचा विरोधकांवर घणाघात
  • या भागातील ३४ हजार एकर शेतजमीन बागायत केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही – सावंत

आरसोली/देवळाली गेली ३५ वर्षे कृष्णा-भीमा स्थिरीकरणाचे पाणी विरोधकांना या मतदारसंघात का आणता आले नाही? असा खडा सवाल करून, यांच्या निष्क्रियतेमुळे मतदारसंघातील घरटी एक एकजण पोट भरण्यासाठी पुण्यात गेला आहे. जेथे पाऊस पडत नाही, तेथे यांनी धरणे बांधली. पर्जन्यमान कमी असल्याने धरणं भरणार कशी? त्यातही कहर म्हणजे धरणाच्या अगोदर कॅनॉल बांधले. कृष्णा-भीमा स्थिरीकरणाचं पाणी आणणार म्हणून गेली ३५ वर्षे यांनी बॅनरवरच पाणी दाखवलं. बॅनर पाहून पाणी येणार या आशेवर अनेकांची लग्नं झाली, तरी पाणी आलं नाही. यांनी फक्त लोकांना फसविण्याचं काम केलं, अशी घणाघाती टीका ‘महायुती’चे शिवसेनेचे उमेदवार तथा राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री व धाराशिवचे पालकमंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांनी केली.

आरसोली, सावरगाव, दरे, देवळाली येथील ग्रामस्थांसाठी मंगळवारी (दि.१२) रात्री देवळाली येथे महायुतीची जाहीर सभा पार पडली. तसेच, आरसोली येथेही उपस्थित नागरिकांना संबोधित करण्यात आले. याप्रसंगी प्रा. डॉ. सावंत बोलत होते. ते पुढे म्हणाले, की गेल्या अडिच वर्षात विकासाची गंगा या भागात आणली असून, कुठल्याही व्यक्तीने यापुढे आपले गाव सोडू नये. होत नाही, हा शब्दच माझ्या डिक्शनरीत बसत नाही. आरसोलीला प्रतीभूमसारखे बनवणार असून, जनतेची सेवा करण्याचा मला पांडुरंगाचा आदेश आहे, म्हणून ही कामे मी करू शकलो. इथले प्रस्थापित हे वतनदार होते, आणि माझा हा संघर्षाचा वारसा येथील विस्थापितांसाठी आहे. आपल्या मतदारसंघात गेली २५ वर्षे सत्ता एकाच घरात होती, त्याचा लेखाजोखा आपण त्यांच्याकडून घेतला पाहिजे. तब्बल ३५ वर्षानंतर कृष्णा-भीमा स्थिरीकरणातील आपल्या हक्काचे पाणी सीना कोळेगाव धरणात येत्या गुढी पाडव्याला पडणार असून, येथील ३४ हजार एकर जमीन बागायत केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. पाण्याचा प्रश्न कायमचाच सोडवायचा असेल तर पुढची पाच वर्षे देणे गरजेचे आहे. यासाठी सर्वाधिक मतांनी विजयी करा, असे आवाहनही प्रा. तानाजीराव सावंत यांनी केले.

ग्रामपंचायतही आपल्या ताब्यात असली पाहिजेत, असे सांगून एका व्यक्तीच्या ताब्यात गाव कधीच देऊ नका. तसं केल्यास त्याच्या निर्णयात स्वार्थ येतो. असल्या गोष्टीला शिवसेनेत थारा नाही. नेत्याचे चारित्र्य व नियत साफ असेल तरच अधिकारी घाबरतात, आणि अधिकारी हे जनतेचे सेवक असतात, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजेत, असेही प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांनी याप्रसंगी उपस्थित जनसमुदयाला सांगितले.

Previous Post

नात्यागोत्याचे राजकारण विकासाच्या आड येऊ देऊ नका – प्रा. डॉ.तानाजीराव सावंत

Next Post

विकास हवा असेल,आपले तालुके सुजलाम सुफलाम करायचे असतील तर धनुष्यबाणाचेच बटण दाबा-डॉ. तानाजी सावंत

Related Posts

नगरपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर
राजकीय

नगरपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

4 November 2025
धाराशिव शहर खड्डेमुक्त होणार!राजमाता जिजाऊ चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक ते सांजा रोड भवानी चौक रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन
राजकीय

धाराशिव शहर खड्डेमुक्त होणार!राजमाता जिजाऊ चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक ते सांजा रोड भवानी चौक रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

1 November 2025
“धाराशिवच्या विकासामध्ये राजकारण नको!”-राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे प्रदेश सरचिटणीस डॉ. प्रतापसिंह पाटील
राजकीय

“धाराशिवच्या विकासामध्ये राजकारण नको!”-राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे प्रदेश सरचिटणीस डॉ. प्रतापसिंह पाटील

31 October 2025
धाराशिव जिल्हा युवती सेना प्रमुखपदी श्वेताताई सागर दुरुगकर यांची नियुक्ती
राजकीय

धाराशिव जिल्हा युवती सेना प्रमुखपदी श्वेताताई सागर दुरुगकर यांची नियुक्ती

29 October 2025
हा आनंद म्हणजे शहराच्या प्रगतीच्या विरोधातील मानसिकतेचा पुरावा- भाजप युवा जिल्हाध्यक्ष राहुल काकडे
राजकीय

हा आनंद म्हणजे शहराच्या प्रगतीच्या विरोधातील मानसिकतेचा पुरावा- भाजप युवा जिल्हाध्यक्ष राहुल काकडे

29 October 2025
भाजपा युवा नेते शंतनू पायाळ यांनी आयोजित केलेला नोकरी महोत्सव व स्वयंरोजगार मेळावा उत्साहात संपन्न
राजकीय

भाजपा युवा नेते शंतनू पायाळ यांनी आयोजित केलेला नोकरी महोत्सव व स्वयंरोजगार मेळावा उत्साहात संपन्न

28 October 2025
Next Post
विकास हवा असेल,आपले तालुके सुजलाम सुफलाम करायचे असतील तर धनुष्यबाणाचेच बटण दाबा-डॉ. तानाजी सावंत

विकास हवा असेल,आपले तालुके सुजलाम सुफलाम करायचे असतील तर धनुष्यबाणाचेच बटण दाबा-डॉ. तानाजी सावंत

Recent Posts

  • धाराशिव राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) जिल्हाध्यक्षपदी डॉ.प्रतापसिंह पाटील यांची नियुक्ती
  • नगरपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर
  • राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आज घोषणा होणार!
  • जय हनुमान ग्रुपचे अध्यक्ष सुरेश कांबळे यांचे राजकारणात पुनरागमन होणार?
  • धाराशिव शहर खड्डेमुक्त होणार!राजमाता जिजाऊ चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक ते सांजा रोड भवानी चौक रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

Recent Comments

No comments to show.

Counter

479884
Users Today : 29
Users Yesterday : 67
This Month : 1821
Total Users : 27249
  • Home Page

© 2024 Rajkiya Katta - Design and Developed by DK Techno's.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान

© 2024 Rajkiya Katta - Design and Developed by DK Techno's.

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group