Monday, March 23, 2026
rajkiyakatta.in
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान
No Result
View All Result
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान
No Result
View All Result
rajkiyakatta.in
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान

गेली ३५ वर्षे विरोधकांना पाणी आणता आलं नाही,फक्त लोकांना फसवलं-डॉ.तानाजीराव सावंत

Rajkiy Katta by Rajkiy Katta
13 November 2024
in राजकीय
0
गेली ३५ वर्षे विरोधकांना पाणी आणता आलं नाही,फक्त लोकांना फसवलं-डॉ.तानाजीराव सावंत
0
SHARES
85
VIEWS

  • देवळाली येथील जाहीर सभेतून प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांचा विरोधकांवर घणाघात
  • या भागातील ३४ हजार एकर शेतजमीन बागायत केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही – सावंत

आरसोली/देवळाली गेली ३५ वर्षे कृष्णा-भीमा स्थिरीकरणाचे पाणी विरोधकांना या मतदारसंघात का आणता आले नाही? असा खडा सवाल करून, यांच्या निष्क्रियतेमुळे मतदारसंघातील घरटी एक एकजण पोट भरण्यासाठी पुण्यात गेला आहे. जेथे पाऊस पडत नाही, तेथे यांनी धरणे बांधली. पर्जन्यमान कमी असल्याने धरणं भरणार कशी? त्यातही कहर म्हणजे धरणाच्या अगोदर कॅनॉल बांधले. कृष्णा-भीमा स्थिरीकरणाचं पाणी आणणार म्हणून गेली ३५ वर्षे यांनी बॅनरवरच पाणी दाखवलं. बॅनर पाहून पाणी येणार या आशेवर अनेकांची लग्नं झाली, तरी पाणी आलं नाही. यांनी फक्त लोकांना फसविण्याचं काम केलं, अशी घणाघाती टीका ‘महायुती’चे शिवसेनेचे उमेदवार तथा राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री व धाराशिवचे पालकमंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांनी केली.

आरसोली, सावरगाव, दरे, देवळाली येथील ग्रामस्थांसाठी मंगळवारी (दि.१२) रात्री देवळाली येथे महायुतीची जाहीर सभा पार पडली. तसेच, आरसोली येथेही उपस्थित नागरिकांना संबोधित करण्यात आले. याप्रसंगी प्रा. डॉ. सावंत बोलत होते. ते पुढे म्हणाले, की गेल्या अडिच वर्षात विकासाची गंगा या भागात आणली असून, कुठल्याही व्यक्तीने यापुढे आपले गाव सोडू नये. होत नाही, हा शब्दच माझ्या डिक्शनरीत बसत नाही. आरसोलीला प्रतीभूमसारखे बनवणार असून, जनतेची सेवा करण्याचा मला पांडुरंगाचा आदेश आहे, म्हणून ही कामे मी करू शकलो. इथले प्रस्थापित हे वतनदार होते, आणि माझा हा संघर्षाचा वारसा येथील विस्थापितांसाठी आहे. आपल्या मतदारसंघात गेली २५ वर्षे सत्ता एकाच घरात होती, त्याचा लेखाजोखा आपण त्यांच्याकडून घेतला पाहिजे. तब्बल ३५ वर्षानंतर कृष्णा-भीमा स्थिरीकरणातील आपल्या हक्काचे पाणी सीना कोळेगाव धरणात येत्या गुढी पाडव्याला पडणार असून, येथील ३४ हजार एकर जमीन बागायत केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. पाण्याचा प्रश्न कायमचाच सोडवायचा असेल तर पुढची पाच वर्षे देणे गरजेचे आहे. यासाठी सर्वाधिक मतांनी विजयी करा, असे आवाहनही प्रा. तानाजीराव सावंत यांनी केले.

ग्रामपंचायतही आपल्या ताब्यात असली पाहिजेत, असे सांगून एका व्यक्तीच्या ताब्यात गाव कधीच देऊ नका. तसं केल्यास त्याच्या निर्णयात स्वार्थ येतो. असल्या गोष्टीला शिवसेनेत थारा नाही. नेत्याचे चारित्र्य व नियत साफ असेल तरच अधिकारी घाबरतात, आणि अधिकारी हे जनतेचे सेवक असतात, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजेत, असेही प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांनी याप्रसंगी उपस्थित जनसमुदयाला सांगितले.

Previous Post

नात्यागोत्याचे राजकारण विकासाच्या आड येऊ देऊ नका – प्रा. डॉ.तानाजीराव सावंत

Next Post

विकास हवा असेल,आपले तालुके सुजलाम सुफलाम करायचे असतील तर धनुष्यबाणाचेच बटण दाबा-डॉ. तानाजी सावंत

Related Posts

धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा पेच: भाजप-शिवसेनेत काटाजोड; अर्चनाताई पाटील की उषा गायकवाड?
राजकीय

धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा पेच: भाजप-शिवसेनेत काटाजोड; अर्चनाताई पाटील की उषा गायकवाड?

10 March 2026
भूम तालुक्यातील ५ जिल्हा परिषद गटात ७० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात,अंतिम चित्र 27 तारखेला स्पष्ट होणार
राजकीय

भूम तालुक्यातील ५ जिल्हा परिषद गटात ७० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात,अंतिम चित्र 27 तारखेला स्पष्ट होणार

23 January 2026
तेरखेडा जिल्हा परिषद गटातून भाजपकडून प्रवीण घुले इच्छुक
राजकीय

तेरखेडा जिल्हा परिषद गटातून भाजपकडून प्रवीण घुले इच्छुक

9 January 2026
इच्छुकांना नगरपालिका  निवडणुकांनंतर आता वेध जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे
राजकीय

इच्छुकांना नगरपालिका निवडणुकांनंतर आता वेध जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे

27 December 2025
नगरपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर
राजकीय

नगरपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

4 November 2025
धाराशिव शहर खड्डेमुक्त होणार!राजमाता जिजाऊ चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक ते सांजा रोड भवानी चौक रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन
राजकीय

धाराशिव शहर खड्डेमुक्त होणार!राजमाता जिजाऊ चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक ते सांजा रोड भवानी चौक रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

1 November 2025
Next Post
विकास हवा असेल,आपले तालुके सुजलाम सुफलाम करायचे असतील तर धनुष्यबाणाचेच बटण दाबा-डॉ. तानाजी सावंत

विकास हवा असेल,आपले तालुके सुजलाम सुफलाम करायचे असतील तर धनुष्यबाणाचेच बटण दाबा-डॉ. तानाजी सावंत

Recent Posts

  • युट्यूबवर‘कलवरी’चा विक्रम;10 लाख व्ह्यूज पार,भूमच्या निर्मात्याचा अभिमान
  • जि.प. सभापतीपदाची लॉटरी कोणाला? धाराशिवच्या राजकारणात उत्सुकता वाढली
  • माजी मंत्री आ. डॉ.तानाजी सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त परंड्यात रंगणार भव्य कुस्तीचा महासंग्राम
  • भाजपामध्ये पक्ष प्रवेश करून येताना जिल्हा परिषद सदस्य धनंजय सावंत यांच्या गाडीचा भीषण अपघात; थोडक्यात बचाव
  • शिवसेना पक्षाला धक्का, आ.डॉ.तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांच्या कुटुंबीयांसह समर्थकांचा भाजपमध्ये प्रवेश

Recent Comments

No comments to show.

Counter

483497
Users Today : 28
Users Yesterday : 40
This Month : 1177
Total Users : 30862
  • Home Page

© 2024 Rajkiya Katta - Design and Developed by DK Techno's.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान

© 2024 Rajkiya Katta - Design and Developed by DK Techno's.

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group